marathiblogs

***ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. ब्लॉगविषयी कुठलीही तक्रार असल्यास dattahujare@gmail.com वर मेल करा. लेखक: कमलेय(दत्ता हुजरे)***


Monday, May 2, 2016

मराठी #Trend - सिनेमास्कोप (सैराट)

सलमान खानची थम्सअपची जाहिरात येते "आज कुछ तुफानी करते है। ", तुफान हा शब्द मराठीत वापरात असला तरी तो मुळचा मराठी नाही. आपल्याला असाच एक धासु शब्द भेटला तो म्हणजे "सैराट", "आज काही सैराट करुया.. ". मराठीतल्या एका बोली भाषेतला शब्द आजकाल बराच ओळखीचा झाला. का? कसा? हे आता सर्वानाच माहीत आहे. सैराटची कथा काय आहे?, कशी आहे? कोण कलाकार आहेत? या सर्व गोष्टी आता ठाऊक आहेतच. मुळात विषय हा आहे सैराटसारखा विषय घेउन या आधीही चित्रपट आले नाहीत काय ? हो आले आहे पण सैराट यशस्वी होण्यामागचे कारण आहे त्याला दिला गेलेला न्याय. न्याय ह्या अर्थाने म्हणता येईल की नागराज मंजुळे या लेखकाला पुर्ण स्वतंत्रता देऊन विषयाची मांडणी करु देणे आणि त्यालाच त्या कथेवर संवाद आणि दिग्दर्शन करु देणे. कथा खुप सामान्य असली तरी त्याची मांडणी उत्तम प्रकारे कशी करता येते हे नागराजने याआधी ’फॅंण्ड्री’ आणि आता ’सैराट’ या दोनही चित्रपटात दाखवुन दिले. मुळात लेखकाला ज्या वेळेस सर्व गोष्टिंचा वाव दिला गेला., जसे कि कास्टींग असेल, लोकेशन असतील, संवाद असतील, तर चित्रपट अधिक उजवा होऊ शकतो कारण ज्यावेळेस कुठलाही लेखक कथा लिहित असतो त्या वेळेस तो त्यातल्या भुमिका जगलेला असतो आणि प्रत्येक वेळेस वास्तवातल्या जगाशी तुलना केली जाते म्हणुनच नागराजने केलेली स्टार कास्टींग सरस ठरली.



वास्तववादी सिनेमा हा मराठी चित्रपट सृष्टिचा आत्मा म्हणावा लागेल., हॉलीवुड जितके वास्तवापलीकडे जाऊन विषय हाताळते त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टि वास्तवावर आधारित विषय हाताळते. तुलना यासाठी केली गेली बॉलीवुडमधेही असे सिनेमे बनतात पण त्या मागे जो मसाला भरला जातो तो वास्तवापेक्षा वेगळा असतो, अर्थात तिथे फक्त व्यावसायिकता जपण्यासाठी धडपड चालु असते. मराठी चित्रपट इंडस्ट्रीला हा विचार कधीच डोक्यात कधीच घ्यावा लागत नाही कारण मराठी रसिक हा सर्वार्थाने उच्चकोटिचा आहे, तो जर ’लय़ी भारी’ पाहतो तर तोच ’नटसम्राट’ ही डोक्यावर घेतो, तसेच तो ’फॅंण्ड्री’ सारख्या विचार करायला लावणार्‍या चित्रपटाला पण न्याय देतो. हाच तर मराठी प्रेक्षकाचा मोठेपणा आहे. ’सैराट’ सिनेमा वास्तववादी तर आहे पण आपण जर शुटिंग लोकेशन पाहिलेत तर लक्षात येते की फार काही बदल न करता जे आहे तसेच दाखवले आहे. बॉलीवुडमधे यश चोप्राच्या सिनेमात नयनरम्य असे काश्मीरचे नजारे घेतले असायचे अर्थातच तो भव्यदिव्य देखावा मन हुरळुन टाकणारा असायचा. महाराष्ट्रही काहि कमी नाही हे याआधी ’वळु’, ’देऊळ’ मधे पाहीलेच आहे, ’सैराट’ च्या निमित्तान पुन: एकदा नागराजने दाखवुन दिले की महाराष्ट्रात न सेट लावता शुटिंग करता येईल फक्त लोकेशन शोधन्याची नजर हवी आहे. शुटिंग लोकेशनच्या बाबतीत पण सिनेमा सरस ठरला हेच सांगायचे आहे.

मुळात सिनेमाचे तिकिटबारिवरचे यशही छान आहे. ३ दिवसात या फिल्मने जवळपास १२ कोटींचा गल्ला जमा केला आहे फार क्वचित वास्तवदर्शी सिनेमांना हा लाभ होतो. ’फॅंण्ड्री’ लाभलेले यश आणि त्याचा प्रमोशनसाठी खुबीने केलेला वापर, ट्रेलर बनवतांना दाखवलेली कल्पकता लाजवाब आहे आणि अजय-अतुल या व्दयीचे सुपरहिट संगीत सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेउन जाते. एकुणच काय तर फिल्म मेकिंगच्या बाबतीत म्हणाल तर एक नंबर आहे.

वरिल सर्व बाजु ह्या सिनेमाविषयी चांगल्या असल्या तरी संस्कृतीरक्षकांची ओरड तीही लक्षात घ्यावी लागेल., त्यांचे म्हणणे असे लागते की अशा फिल्म्समुळे बालवयातील प्रेमप्रकरणाचे उद्दातीकरण  होते. एक फिल्म जर नक्की इतका परिणाम करत असेल आणि बदल इतक्या झटक्यात होत असेल तर विचार करावाच लागेल पण ’फॅंण्ड्री’ फिल्म आल्यानंतरही जब्यासारख्या अनेकांना समाजाने सन्मान द्यायला सुरुवात केली असेही नाही, ’थ्री इडियट’ नंतर शिक्षणप्रणाली बदलली असेही नाही मग ह्या एका फिल्मने संस्कृतीरक्षकांनी गहजब का करावा हे विचारवंताना सांगण्याची गरज नाही.

थोडे नागराजबद्दल, फार थोडे लेखक कलाकृतीला योग्य न्याय देऊ शकतात. नागराजने दोनही फिल्म्सला तो दिला आणि मराठी चित्रपट सृष्टित आता ब्रॅण्ड बनला आहे. बाकी तो कुठल्या जात, समाज, धर्माचा आहे या सगळ्या गोष्टी गौण ठरतात त्याने जातीची चौकट मोडित काढुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितित एका ग्लॅमरस दुनियेत आपले स्थान बनवले आहे तेव्हा आपणही आपल्या विचारांची चौकट मोडुन टाकु आणि सैराट होऊन जाऊ.


Friday, September 11, 2015

अन प्रवास इथेच संपला !!! भाग ४

बाहेर पडणारा पाऊस आणि आत नव्या प्रेमकथेची सुरुवात सगळेच कसे जुळुन आले होते. आता याची तगमग वाढत चालली कारण लवकरच स्टॉप येणार होता. ’तिला बाय करावे का?; याच्या मनात विचार डोकावला, ’पण इतके सारे लोक आहेत, नको उगाच’ असा विचार करता करता नकळत हात केसांवर फिरवण्यासाठी वर केला आणि बाय असे म्हणनारी ओठांवरची पुसट हालचाल तिला दिसली तसे तिही ओठांवरचे हसु दाबत बाहेर बघु लागली. स्टॉपवर बस थांबली होती आणि नाइलाजस्तव का होइना याला उतरावे लागले. ’ती हसली का असेल, आणि रिस्पॉन्स पण काहिच दिला नाही सरळ बाहेर बघायला लागली’ नाही म्हट्ले तरी याचे मन खट्टु झाले होते. त्याला हि गोष्ट मित्रांना विचारावी वाटली पण काय करणार हा पोहचेपर्यंत ते सिटी बसने गेले पण होते.

Sunday, June 28, 2015

अन प्रवास इथेच संपला !!! भाग ३

सकाळी आलार्म वाजला तसे डोळे किलकिले करुन उघडत एक आळस भरला. पुन: रजाई अंगावर ओढत आज जावेच नाहि असे वाटत होते पण इतक्यात लखकन विज चमकावी तसा उठला ’अरे यार ती बस नाही मिस झाली पाहिजे हरी अप देव..... ती असेल का पण आज,.... ओय सकाळी सकाळी निगेटिव विचार नको करु असेल ती’ असे मनात व्दंद खेळत खेळत तो आवरु लागला. आज कधी नव्हे ते इतक्या लवकर आवरले.

Tuesday, January 21, 2014

अन प्रवास इथेच संपला !!! भाग २

शेवटि मनाचा हिय्या करुन त्याने बोलायचं ठरवलच आणि तिच्य़ाकाडे वळाला पण पुनः पंचायत ’हिचं नाव काय आहे’, त्याने बुध्दिवर ताण देउन आठवण्याचा प्रयत्न केला पण काहि केल्या तिचं नाव काय आहे ते आठवेना, शेवटी ’शुकशुक’ अशी साद घातली पण तिकडुन काहिच प्रतिसाद नव्हता. दोन तिनदा परत प्रयत्न केला तरिही काहिच नाही. ’हि बहिरी आहे काय,काय करु म्हणजे हि बघेल?’ असा मनात विचार घोळत असतानाच त्याने तिला हात लावला. तशी ती गर्रकन वळुन एकदम गरजलीच, "काय आहे?" इकडे मात्र जगदंबा अवतार पाहिल्यावर वाट लागली......

Saturday, January 4, 2014

अन प्रवास इथेच संपला !!! भाग-१

***********************************************************

प्रास्ताविक : हि कथा माझ्या काही अनुभवाचा मेळ आहे. वास्तव जीवनात यातील पात्रांचा किंवा घटनेचा किंवा स्थळाचा यथातथा कोणाशी काहि संबध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.मनोरंजन हाच केवळ हेतु.......  

**********************************************************

तो प्रवास त्याच्यासाठी नविन नव्हता, नेहमीप्रमाणेच बसची वाट पहात असलेला तो.....आयुष्याची रोजची तीच तगमग. मनात घोंगावणारे विचार चेहर्‍यावर दाटुन आले होते.आजही पुन्हा कॉलेजला लेट...पहिलं लेक्चर जाणार..हम्म्म हे तर रोजचच होउन बसलय.,त्याला नेहमी वाटायचं आयुष्यात काहीच कशी एक्साइटमेंट नाही. अर्थात हेही त्याच्या मनपटलावर रोजच बिंबत होतं. तेव्हढ्यात मागुन पुढे जाणारा

Thursday, December 22, 2011

The Indian Brand


गेल्या काही दिवसापासुन रिटेल मध्ये परकिय गुंतवणुकीचा विषय गाजत होता. अनेक जण यावर आपले मत प्रदर्शित करुन अकलेचे तारे तोडत होते पण हे मत प्रदर्शन निव्वळ भावनात्मक होते किंवा राजकिय होते.जरि आज हा मुद्दा बासनात गुंडाळला असला तरि त्याच्यावर अभ्यासक आणि चिकित्सक वृत्तीने विचार करायला हवा.एकूणच भारत ही जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठ, अमेरिकेच्या भाषेत डंपिंग ग्राउंड(जिथे काहीही फेकलं तरि विकतं) म्हणुनच परकिय गुंतवणुकदार रिटेल क्षेत्रात करण्यात अंत्यत उत्सुक आहेत. याला सरकारकडुन अनेक कारणंही दिली गेली त्यातीलच एक शेतमालाला वाढिव भाव मिळणार, मालाची नासाडी होणार नाही वगैरे वगैरे.विरोधकांनीही किरकोळ दुकानदार उध्दवस्त होईल इत्यादी कारण देत भारत बंद(विरोधकांचे सर्वात स्वस्त ह्त्यार) केला, ज्यांच्यासाठी केला त्यांचा प्रतिसाद मूळात संमिश्र होता.काही काळ संसदही बंद होती असो.. मुळात आपण याचे फायदे तोटे बघु.